भारतीय रेल्वेत १५ रुपयांची २० ला विकली: प्रवाशाच्या तक्रारीनंतर केटरिंग कंपनीला एक लाखाचा दंड

भारतीय रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी एक अशीच घटना घडली, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई केली. ट्रेन क्रमांक १२४१४ पूजा सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याबाबत तक्रार केली. ही तक्रार १३९ हेल्पलाईनवर नोंदवली गेली, आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने संबंधित केटरिंग कंपनीवर कारवाई केली.



घटना अशी घडली की, थर्ड एसी कोचमधील कॅटरिंग स्टाफने एक पाण्याची बाटली २० रुपयांना विकली, जी १५ रुपयांना मिळायला हवी होती. प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता, कर्मचारी उत्तर दिले की ‘आम्हालाही पाच रुपये हवे आहेत’. यावर प्रवाशाने फोनवर रेकॉर्डिंग केली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई केली आणि केटरिंग कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

हेही वाचा:



या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली, ज्यामुळे ही बातमी वेगाने व्हायरल झाली. युजर्सनी या प्रकारावर आपले मत व्यक्त केले असून, अनेकांनी भारतभर रेल्वेच्या कॅटरिंग सेवा आणि अतिरिक्त शुल्कांबाबत तक्रारी केल्या. काही प्रवाशांनी ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी केल्या आहेत.



या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाचे कठोर पावले उचलताना दिसून आले असून, प्रवाशांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे दिसते.

Leave a Comment