कोरोनाच्या काळात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली महत्त्वाची भूमिका निभावली. राज्य सरकारने आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ५ ऑगस्ट २०२३ रोजी महिला आरोग्य सेविकांच्या ५९७ रिक्त जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, आरोग्य विभागाने १९ जुलै २०२४ रोजी उमेदवारांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या आधारावर, सर्वसाधारण प्रवर्गातील १७० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ४३ उमेदवार प्रतीक्षेत ठेवले गेले आहेत.
हेही वाचा:
भरती प्रक्रिया निवडणुकांच्या तोंडावर होऊन आचारसंहितेच्या अडसरामुळे नियुक्तिपत्र देण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, ‘पेसा’ योजनेअंतर्गत ३५ पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देऊन, त्यांनी आचारसंहितेच्या काळात आरोग्यसेविका म्हणून आपली जबाबदारी सांभाळली. आता आचारसंहिता संपल्यानंतर, उमेदवारांनी पुन्हा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आग्रह केला आहे.
भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीनंतर, या फाइलला जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केले जाईल.
आरोग्य विभागाने या भरती प्रक्रियेत फक्त ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी (एएनएम) पदविका प्रमाणपत्राची अट ठेवली आहे. काही महिलांनी जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग) प्रमाणपत्रावर अर्ज केला होता. कागदपत्रांची पडताळणी करताना ज्या उमेदवारांकडे एएनएम प्रमाणपत्र नव्हते, त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीत अजून काही उमेदवारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.
- WCL 2025: भारत चॅम्पियन्स संघाचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार – देशहिताला प्राधान्य
- भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचा ऐतिहासिक टप्पा: ‘NISAR’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना फडणवीसांचा स्पष्ट नकार
- ट्रम्प यांचा भारतावर नवा आर्थिक हल्ला: 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू
- ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत तज्ज्ञांची मते; महत्त्वपूर्ण शिफारसी सादर