केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे पेन्शनधारक अजूनही वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे राहून गेले आहेत, त्यांच्यासाठी त्वरित कृती करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर महिन्यापासून पेन्शन थांबवली जाऊ शकते.
महत्त्वाची तारीख:
८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते, तर इतर पेन्शनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे प्रमाणपत्र सादर करायचं होतं. आता फक्त ८ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे जे प्रमाणपत्र सादर करायचं राहून गेले आहे, त्यांनी त्वरित हे काम पूर्ण करावं.
प्रमाणपत्र सादर करण्याचे पर्याय:
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी ओळखपत्राची आवश्यकता असेल. तसेच, तुम्ही पोस्टाद्वारे, उमंग अॅप किंवा पीडीएद्वारेदेखील प्रमाणपत्र सादर करू शकता.
प्रमाणपत्र सादर न केल्यास काय होईल?
जर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास, डिसेंबर महिन्यापासून तुमचं पेन्शन थांबवण्याची शक्यता आहे. UIDAI नुसार, जीवन प्रमाणपत्र एकदा सादर केल्यावर पेन्शन थकबाकी रक्कमेसह दिली जाईल, पण तीन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जमा केले जाणार नाही.
तुम्ही लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र सादर करा, जेणेकरून तुमचं पेन्शन वेळेवर मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
- टेस्ला शोरूम उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल – “२५ लाखांची कार ६० लाखांना, जबाबदार कोण?”
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल लांबला
- TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक
- Vivo X200 FE भारतात लॉन्च: डायरेक्ट अॅपलसोबत स्पर्धा? Samsung आणि गुगलने ही घेतला धसका
- TAIT 2025 परीक्षा : B.Ed Appeared उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, गुणपत्रक पाठवण्यास…