जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडलेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये 10 संघांनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च केले आणि 182 खेळाडूंवर बोली लावली. या खेळाडूंमध्ये 62 परदेशी खेळाडूंचाही समावेश होता. 8 खेळाडूंना आरटीएमद्वारे त्यांच्या मूळ संघांनीच पुन्हा संघात सामील केलं. ऋषभ पंत याने सर्वाधिक किंमत मिळवत ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान पटकावला.
दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने युवा कोट्यधीश खेळाडूचा बहुमान मिळवला. मात्र, 395 खेळाडूंना कोणत्याही संघाने निवडले नाही, ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी स्टार पृथ्वी शॉ याचाही समावेश होता. पृथ्वीला त्याचा अनियमित वर्तन आणि फॉर्मचा फटका बसला.
पृथ्वी शॉला मोठा फटका
गेल्या काही वर्षांतील खराब फिटनेस, शिस्तभंग, आणि वैयक्तिक जीवनातील वाद यामुळे पृथ्वी शॉला अनसोल्ड राहावं लागलं. त्याने 75 लाखांची बेस प्राईज निश्चित केली होती, पण एकाही संघाने बोली लावली नाही. याआधी 2023 आणि 2024 हंगामात त्याला 8 कोटींची किंमत मिळाली होती. त्यामुळे यावेळी त्याला मोठा आर्थिक फटका बसला.
मोहम्मद कैफने दिले परखड मत
पृथ्वीच्या अपयशावर प्रतिक्रिया देताना माजी भारतीय खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कोच मोहम्मद कैफ म्हणाला, “पृथ्वीला आता आपल्या खेळावर काम करण्याची गरज आहे. त्याच्या अपयशामुळे त्याला लाज वाटायला हवी. दिल्लीने त्याला खूप संधी दिल्या, पण त्याने त्या साधल्या नाहीत.”
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2025 साठी टीम
दिल्लीने ऑक्शनमध्ये मोठे बदल करत नवीन खेळाडूंचा समावेश केला. रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, आणि अभिषेक पोरेल यांचा समावेश आहे. तर मिचेल स्टार्क, केएल राहुल, फाफ डुप्लेसी, आणि हॅरी ब्रूक यांसारखे स्टार खेळाडू नवीन संघात सामील झाले आहेत.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली असून या हंगामात कोणते खेळाडू चमकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Hero Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च: सर्वात स्वस्त किंमतीत स्मार्ट फीचर्स आणि हटके बॅटरी प्लान
- Motorola ने भारतात लॉन्च केला दमदार Moto G96 5G स्मार्टफोन; किंमत ₹17,999 पासून
- SIP च्या माध्यमातून १० वर्षांत बना कोटीपती! जाणून घ्या संपूर्ण योजना
- कर्नाटकमधील गुहेत दोन मुलींंसह राहणारी रशियन महिला सापडली, व्हिसा २०१७ पासून कालबाह्य
- जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण